
वन-डे, टी २० मालिका खेळणार
मुंबई ः इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय संघ बांगलादेशचा दौरा करणार आहे. हा दौरा ऑगस्ट महिन्यात होईल. भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ एकदिवसीय आणि ३ टी २० सामन्यांची मालिका होईल.
बीसीसीआयने या मर्यादित षटकांच्या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बांगलादेशचा हा दौरा १७ ऑगस्टपासून सुरू होईल आणि ३१ ऑगस्टपर्यंत चालेल. या दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होईल. एकदिवसीय मालिकेतील तीन सामने १७, २० आणि २३ ऑगस्ट रोजी खेळवले जातील, तर टी २० आंतरराष्ट्रीय सामने २६, २९ आणि ३१ ऑगस्ट रोजी खेळवले जातील. हे सहा सामने मीरपूर आणि चितगाव येथे खेळवले जातील.
सध्या सर्व भारतीय खेळाडू इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या १८ व्या आवृत्तीत खेळत आहेत. आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करेल. भारतीय संघ जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. इंग्लंड मालिका ४ ऑगस्ट रोजी संपेल. भारताचा देशांतर्गत हंगाम ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल. ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिज संघ भारत दौऱ्यावर येईल.
वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर
भारताचा घरचा हंगाम २ ऑक्टोबर रोजी वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने सुरू होईल. त्यानंतर, दक्षिण आफ्रिकेचा संघ नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येईल. दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. दोन घरच्या मालिकांनंतर, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल जिथे तीन एकदिवसीय आणि पाच टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले जातील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या महिन्याच्या सुरुवातीला मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिका १९ ऑक्टोबरपासून सुरू होईल. टी २० मालिका २९ ऑक्टोबरपासून सुरू होईल.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना : १७ ऑगस्ट – मीरपूर
दुसरा एकदिवसीय सामना : २० ऑगस्ट – मीरपूर
तिसरा एकदिवसीय सामना : २३ ऑगस्ट – चितगाव
टी २० मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी २० : २६ ऑगस्ट – चितगाव
दुसरा टी २० : २९ ऑगस्ट – मीरपूर
तिसरा टी २० : ३१ ऑगस्ट – मीरपूर