आरसीबी संघ चौथ्यांदा अंतिम फेरीत 

  • By admin
  • May 29, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

पंजाब किंग्जची आत्मघातकी फलंदाजी; जोश हेझलवूड, सुयश शर्माची घातक गोलंदाजी 

चंदीगड : जोश हेझलवूड (३-२१), सुयश शर्मा (३-१७) यांच्या घातक स्पेलच्या बळावर आरसीबी संघाने यंदाच्या आयपीएल हंगामात अंतिम फेरी गाठली आहे. क्वालिफायर १ सामन्यात आरसीबी संघाने अविस्मरणीय कामगिरी नोंदवत पंजाब किंग्ज संघावर आठ विकेट आणि दहा षटके राखून दणदणीत विजय मिळवला. या पराभवामुळे आता पंजाब संघ मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स यांच्यातील विजेत्या संघाशी खेळेल. आरसीबी संघ चौथ्यांदा (२००९, २०११, २०१६) अंतिम फेरीत पोहोचला आहे.

आरसीबी संघासमोर अंतिम फेरी गाठण्यासाठी १०२ धावांचे आव्हान होते. धावसंख्या फार मोठी नसली तरी खेळपट्टी गोलंदाजांना मदत करत असल्याने फलंदाजांना धावा फटकावणे सहज जात नव्हते. विराट कोहली व फिल सॉल्ट या सलामी जोडीने अपेक्षेप्रमाणे आक्रमक सुरुवात केली. कोहली १२ धावांवर बाद झाला. त्याने दोन चौकार मारले. जेमिसन याने कोहलीची  विकेट घेऊन सामन्यात थोडी रंगत आणली. परंतु, त्यानंतर सॉल्ट व मयंक अग्रवाल या जोडीने दमदार फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी करुन संघाचा विजय सुकर बनवला. पहिला आयपीएल सामना खेळणाऱ्या मुशीर खान याने पहिल्याच षटकात मयंक अग्रवालला १९ धावांवर बाद करुन संघाला दुसरे यश मिळवून दिले. अग्रवाल १३ चेंडूत दोन चौकार व एक षटकार मारुन बाद झाला. या जोडीने ५४ धावांची भागीदारी करुन संघाचा विजय निश्चित केला. 


एका बाजूने विकेट पडत असताना सॉल्ट याने धमाकेदार फलंदाजी केली. सॉल्ट याने २३ चेंडूत आक्रमक अर्धशतक ठोकले. सॉल्ट याने २७ चेंडूत नाबाद ५६ धावांची बहारदार खेळी केली. त्याने सहा चौकार व तीन षटकार ठोकले. कर्णधार रजत पाटीदार याने नाबाद १५ धावांचे योगदान दिले. पाटीदारने मुशीर खानला उत्तुंग षटकार ठोकत अंतिम फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. आरसीबी संघाने १० षटकात दोन बाद १०६ धावा फटकावत दमदार विजय साकारला. 

आरसीबी संघाची घातक गोलंदाजी 


आरसीबी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय एकदम अचूक ठरला. पंजाब किंग्ज संघ घरच्या मैदानावर खेळत असतानाही १४.१ षटकात अवघ्या १०१ धावांवर गारद झाला. 


या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाब संघाला मोठा धक्का दिला. पंजाब संघ १४.१ षटकांत १०१ धावांवर ऑलआऊट झाला. त्यांच्याकडून मार्कस स्टोइनिसने सर्वाधिक २६ धावा केल्या. त्याच वेळी, प्रभसिमरन आणि अझमतुल्ला उमरझाई हे प्रत्येकी १८-१८ धावा करून बाद झाले. त्यांचे सहा फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. आरसीबीकडून जोश हेझलवूड आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले तर यश दयाल यांनी दोन बळी घेतले. याशिवाय भुवनेश्वर कुमार आणि रोमारियो शेफर्ड यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्ज १०१ धावांवर ऑलआऊट झाला. आरसीबीच्या गोलंदाजांनी कहर केला, परिणामी पंजाबचे ८ फलंदाज धावांच्या बाबतीत दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. पंजाब संघ आतापर्यंत फलंदाजीत चांगली कामगिरी करत होता, परंतु जोश हेझलवूड, सुयश शर्मा यांच्या घातक गोलंदाजीसमोर श्रेयस अय्यर, प्रियांश आर्य यांच्यासह कोणताही फलंदाज काहीही करू शकला नाही.

मुल्लानपूर स्टेडियमवर नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, हा निर्णय खूप चांगला ठरला. संघाची सुरुवात खूपच खराब झाली, कारण दोन्ही सलामीवीरांनी २७ धावांनी आपले बळी गमावले होते. कर्णधार श्रेयस अय्यरने त्याच्या फलंदाजीच्या शैलीने आणि कर्णधारपदाने खूप प्रभावित केले होते, परंतु तो फक्त २ धावा करून बाद झाला.

अर्धा संघ ५० धावांनी पॅव्हेलियनमध्ये परतला
आयपीएल २०२५ मध्ये टेबल टॉपर असलेल्या पंजाब किंग्जची अवस्था इतकी वाईट होती की पंजाब संघाचा अर्धा संघ ५० धावांनी पॅव्हेलियनमध्ये परतला होता. सहसा शशांक सिंग पंजाबसाठी तारणहार ठरला आहे, परंतु यावेळी तोही अपयशी ठरला. शशांकच्या बॅटमधून फक्त ३ धावा आल्या. आठव्या क्रमांकावर मुशीर खानला संधी मिळाली, जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे, पण तो त्याचे खातेही उघडू शकला नाही.

‘सुयश शर्मा’ हा ट्रम्प कार्ड आहे

सुयश शर्मा आरसीबीसाठी ट्रम्प कार्ड असल्याचे सिद्ध झाले. त्याने ३ षटकांच्या स्पेलमध्ये फक्त १७ धावा देऊन ३ बळी घेतले. सुयश शर्माच्या फिरकी गोलंदाजीत अडकलेल्या फलंदाजांची नावे मुशीर खान, मार्कस स्टोइनिस आणि शशांक सिंग होती. जेव्हा संघाला त्याची सर्वात जास्त गरज होती, तेव्हा सुयशने जबाबदारी घेतली आणि पंजाबची फलंदाजी उद्ध्वस्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *