आम्ही लढाई हरलो आहोत, युद्ध नाही ः श्रेयस अय्यर 

  • By admin
  • May 30, 2025
  • 0
  • 6 Views
Spread the love

चंदीगड ः आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्ज संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्जचा ८ विकेट्सने पराभव केला. आरसीबी संघ तब्बल ९ वर्षांनी आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला. पराभवानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर याने  सांगितले की आम्ही लढाई हरलो आहोत, युद्ध नाही.

आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला, हा दिवस विसरण्यासारखा नाही, परंतु आम्हाला आमच्या रणनीतीवर पुन्हा काम करावे लागेल. आम्ही लवकर खूप विकेट्स गमावल्या. आता मागे जाऊन अभ्यास करण्यासारखे बरेच काही आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर, मला माझ्या निर्णयांवर शंका नाही. आम्ही जे काही नियोजन केले, मैदानाबाहेर जे काही (योजना) केली, ते मला योग्य वाटते. आम्ही मैदानावर ते प्रत्यक्षात आणू शकलो नाही.”
 
श्रेयस अय्यर पुढे म्हणाला की, “या पराभवासाठी गोलंदाजांना दोष देता येणार नाही, कारण बचाव करण्यासाठी ही खूप कमी धावसंख्या होती. आम्हाला आमच्या फलंदाजीवर काम करावे लागेल, विशेषतः या विकेटवर. आम्ही येथे खेळलेल्या सर्व सामन्यांमध्ये काही चढ-उतार आले आहेत.”

पंजाबचा कर्णधार अय्यर पुढे म्हणाला, “आम्ही अशी कारणे देऊ शकत नाही, कारण आम्ही शेवटी व्यावसायिक आहोत आणि आम्हाला परिस्थितीनुसार फलंदाजी करावी लागते आणि आम्हाला त्यानुसार कामगिरी करावी लागते. आम्ही लढाई हरलो आहोत, पण युद्ध नाही.

पंजाब संघाला आणखी एक संधी
पंजाब किंग्जने पहिला क्वालिफायर सामना ८ विकेट्सने गमावला असेल, परंतु ते आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडलेले नाहीत. पॉइंट्स टेबलच्या टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्याचा फायदा पंजाबला मिळेल. आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जचा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या संघाशी होईल.

जर पंजाबचा संघ दुसरा क्वालिफायर सामना जिंकला तर तो अंतिम फेरीत प्रवेश करेल. त्यानंतर अंतिम फेरीत पंजाब किंग्जचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होईल. तथापि, अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पंजाबला आता कोणत्याही किंमतीत क्वालिफायर-२ जिंकावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *