क्वालिफायर सामना गमावलेला संघ ११ वेळेस अंतिम फेरीत 

  • By admin
  • May 30, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

फक्त मुंबई इंडियन्स संघ आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी 

मुंबई ः आयपीएल स्पर्धेत क्वालिफायर सामन्यात पराभूत झालेला संघ ११ वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे. मात्र, अकरापैकी नऊ वेळा असे संघ पराभूत झाले आहेत. मुंबई इंडियन्स संघाने दोनदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची किमया केली आहे. 

पंजाब किंग्ज संघ क्वालिफायर-१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून पराभूत झाला आहे. आता अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पंजाबला क्वालिफायर-२ जिंकावे लागेल. १ जून रोजी होणाऱ्या या सामन्यात त्यांना एलिमिनेटर सामन्यातील विजेत्याशी सामना करावा लागेल. 

गेल्या हंगामातील उपविजेता संघ सनरायझर्स हैदराबादनेही क्वालिफायर-१ जिंकल्यानंतर क्वालिफायर-२ जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आतापर्यंत असे एकूण ११ वेळा घडले आहे जेव्हा क्वालिफायर-१ मध्ये पराभूत झालेल्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. म्हणजेच त्यांनी क्वालिफायर-२ जिंकला आहे. 
आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद (२०२४), गुजरात टायटन्स (२०२३), राजस्थान रॉयल्स (२०२२), दिल्ली कॅपिटल्स (२०२०), मुंबई इंडियन्स (२०१९), चेन्नई सुपर किंग्ज (२०१५), पंजाब किंग्ज (२०१४), मुंबई इंडियन्स (२०१३), आरसीबी (२०११) या संघांनी असा पराक्रम केला आहे.  क्वालिफायर-१ मध्ये पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाने आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.

आयपीएलच्या ११ हंगामांपैकी, केवळ २ वेळा असे घडले आहे जेव्हा क्वालिफायरमध्ये पराभूत झालेल्या संघाने विजेतेपद जिंकले आहे, तर इतर ९ वेळा असे संघ अंतिम फेरीत पराभूत झाले आहेत. मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे ज्याने क्वालिफायर-१ मध्ये पराभवानंतरही आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. मुंबई इंडियन्स संघाने पहिल्यांदा २०१३ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाला आणि २०१७ मध्ये आरपीएस संघाला हरवून आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. 

क्वालिफायर-१ मध्ये पराभूत झालेला संघ पंजाब किंग्ज १२ व्यांदा अंतिम फेरीत पोहोचतो का हे पाहणे बाकी आहे. यासाठी त्यांना दुसरा क्वालिफायर सामना जिंकावा लागेल, जो १ जून रोजी नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *