
हायब्रीड मॉडेलवर सामने होणार, ३० सप्टेंबरपासून प्रारंभ
दुबई ः आयसीसीने भारत आणि श्रीलंका येथे होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या तारखा आणि ठिकाणांची घोषणा केली आहे. ही जागतिक स्पर्धा ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. हायब्रीड मॉडेल पद्धतीने ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. तब्बल १२ वर्षांनी भारतात महिला विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे.
महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामने भारत आणि श्रीलंकेतील पाच शहरांमध्ये होतील. त्यात बंगळुरूमधील एम चिन्नास्वामी, गुवाहाटी मधील एसीए स्टेडियम, इंदूरमधील होळकर स्टेडियम, विशाखापट्टणम मधील एसीए-व्हीडीसीए स्टेडियम आणि कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियम यांचा समावेश आहे.
अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल
महिला एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना २ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. ३० सप्टेंबर रोजी बंगळुरूमध्ये होणाऱ्या सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होईल. भारताचा संघ उद्घाटन सामन्यात खेळेल. ही जागतिक स्पर्धा १२ वर्षांनंतर भारतात आयोजित केली जाईल. पहिला उपांत्य सामना २९ ऑक्टोबर रोजी गुवाहाटी किंवा कोलंबोमध्ये होईल, तर दुसरा उपांत्य सामना ३० ऑक्टोबर रोजी बंगळुरूमध्ये होईल. अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या दोन्ही संघांना तयारीसाठी दोन दिवसांचा वेळ मिळेल. महिला एकदिवसीय विश्वचषकाचा विजेतेपदाचा सामना २ नोव्हेंबर रोजी बंगळुरू किंवा कोलंबो येथे खेळला जाईल.
आठ संघ सहभागी होतील
महिला एकदिवसीय विश्वचषकात आठ संघ सहभागी होतील, ज्यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत गतविजेता म्हणून प्रवेश करेल. २०२२ मध्ये न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्यांनी इंग्लंडला पराभूत केले. ऑस्ट्रेलियाने सात वेळा विजेतेपद जिंकले आहे आणि तो स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे.
भारत यापूर्वी त्याचे एकमेव यजमान होते. परंतु आता स्पर्धेचे सामने बंगळुरू, गुवाहाटी, इंदूर, विशाखापट्टणम आणि कोलंबो येथे खेळले जातील. कोलंबोमध्ये पाकिस्तान आयसीसी स्पर्धांसाठी भारतात येणार नसल्याने आणि या वर्षाच्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये हायब्रिड मॉडेलला मान्यता मिळाल्यामुळे समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, ही स्पर्धा ३० सप्टेंबरपासून बंगळुरूमध्ये सुरू होईल. १२ वर्षांनंतर भारतात महिला क्रिकेट विश्वचषक आयोजित केला जात आहे.