
मुंबई टी २० लीग
मुंबई ः आयपीएल स्पर्धेनंतर आता मुंबई टी २० लीग स्पर्धेला चार जूनपासून सुरू झाली आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव ट्रायम्फ्स नाईट्स एमएनईच्या संघाचे नेतृत्व करत आहेत. आता या लीगच्या पहिल्या सामन्यात सूर्याने कर्णधारपद भूषविले आहे. ट्रायम्फ्स नाईट्सच्या संघाचा ईगल ठाणे स्ट्रायकर्सच्या संघाने ५ विकेट्सने पराभव केला.
या सामन्यात ट्रायम्फ्स नाईट्स एमएनईच्या संघाने प्रथम फलंदाजी करत १७९ धावा केल्या. कर्णधार सूर्यकुमार यादव याने संघासाठी आक्रमक अर्धशतक झळकावले. त्याने २७ चेंडूत ५० धावांची खेळी खेळली, ज्यामध्ये ८ चौकार आणि एक षटकार होता. त्याच्याशिवाय जिगर सुरेंद्र राणा यांनीही अर्धशतक झळकावले आणि ५३ धावांची खेळी केली. परिक्षित वळसंगकरने २९ धावा आणि जय संजय जैनने २४ धावांचे योगदान दिले.
सिराज पाटीलची दमदार कामगिरी
त्यानंतर ईगल ठाणे स्ट्रायकर्सकडून वरुण लवांडेने ५७ धावा केल्या. त्याच्याशिवाय सिराज पाटीलने २२ चेंडूत ४७ धावा केल्या, ज्यात तीन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. त्याच्यामुळेच ईगल ठाणे संघ शेवटच्या षटकात लक्ष्याचा पाठलाग करू शकला. अनिश मुकुंद चौधरीने ३७ धावा केल्या. या खेळाडूंमुळेच ईगल संघाने १९.२ षटकात १८१ धावा करून लक्ष्य गाठले. सिराज पाटील सामन्यातील सर्वात मोठा हिरो असल्याचे सिद्ध झाले आणि त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.
सूर्याने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती
आयपीएलनंतर सूर्यकुमार यादवने मुंबई टी २० लीगच्या पहिल्या सामन्यात पराभव पत्करला आहे. आयपीएलमध्ये, त्याच्या संघाचा मुंबई इंडियन्सचा क्वालिफायर-२ मध्ये पंजाब किंग्जकडून ५ विकेटने पराभव झाला. सूर्याच्या संघाला विजेतेपद जिंकता आले नसले तरी, त्याने संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली. त्याच्या बॅटमधून एकूण ७१७ धावा आल्या, ज्यात पाच अर्धशतकांचा समावेश होता.