
मुंबई ः इंग्लंड दौऱयात शुभमन गिल याला आता कसोटी फलंदाजीवर काम करावे लागेल. तसेच कर्णधारपदाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळताना त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरले पाहिजे असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांनी शुभमन गिलला त्याच्या कसोटी फलंदाजीवर काम करावे लागेल असे सांगत इंग्लंड दौऱ्यावर कर्णधारपदाच्या अतिरिक्त जबाबदारी दरम्यान, त्याने फलंदाजीच्या क्रमाने चौथ्या क्रमांकावर उतरले पाहिजे असे मत व्यक्त केले.
विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर, भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याबाबत अटकळ बांधली जात आहे. पॉन्टिंग म्हणाला की, कर्णधारपदाच्या सुरुवातीच्या टप्प्यात गिल या क्रमाने उतरू शकतो. आयपीएल दरम्यान पीटीआयशी बोलताना पॉन्टिंग म्हणाला, “पांढऱ्या चेंडूच्या स्वरूपात शुभमन गिल याचा फॉर्म जबरदस्त आहे. त्याला कसोटी फलंदाजीत काही काम करावे लागेल. जर तुम्ही नवीन कर्णधार असाल तर ते सोपे नाही. नवीन कर्णधारासाठी त्याच्या फलंदाजीबद्दल विचार करणे सोपे नाही.”
पाँटिंग म्हणाला की, गिलला कर्णधार बनवून भारताने योग्य निर्णय घेतला आहे. दोन वेळा विश्वचषक विजेता कर्णधार पॉन्टिंग म्हणाला की गिल बराच काळ कर्णधार राहील.गेल्या हंगामात जेव्हा रोहितने सिडनी कसोटी न खेळण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या मते गिल कर्णधार असू शकला असता. बुमराहच्या तंदुरुस्तीबद्दल शंका होत्या आणि त्या सामन्यादरम्यान तो जखमी झाला.”
पॉन्टिंग याने असेही म्हटले की, गिलला कसोटी सामन्यातील फलंदाजीच्या मानसिक पैलूवर काम करावे लागेल. असे महान कसोटी फलंदाज झाले आहेत ज्यांचे बचावात्मक तंत्र तितके चांगले नव्हते. वीरेंद्र सेहवाग याचे एक चांगले उदाहरण आहे, परंतु जर तुमचे तुमच्या फटक्यांवर नियंत्रण असेल तर बचावात्मक तंत्राबद्दल जास्त विचार करण्याची गरज नाही. खेळाच्या मानसिक पैलूवर काम करावे लागेल.”