
मुंबई ः कर्णधार शुभमन गिलसह भारतीय संघातील सर्व खेळाडू मुंबईहून इंग्लंडला रवाना झाले.
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी गुरुवारी रवाना झाला. यावेळी शुभमन गिल मुंबईहून इंग्लंडला रवाना होणाऱ्या संघाचे नेतृत्व करत आहे. यावेळी करुण नायरचाही भारतीय संघामध्ये समावेश करण्यात आला आहे, जो पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंडमध्ये अगोदरच गेला आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळण्यासाठी गेलेली कसोटी मालिका २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद सायकलचा भाग आहे.

भारत आणि इंग्लंडमधील पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना २० जूनपासून लीड्समध्ये खेळला जाईल. या मालिकेसह, भारताचे नवीन जागतिक कसोटी अजिंक्यपद सायकल (२०२५-२७) देखील सुरू होईल. रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या स्टार खेळाडूंनी कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर मे महिन्यात शुभमन गिलची नवीन कसोटी कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. गिल हा भारताचा ३७ वा कसोटी कर्णधार असेल. यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत हा कसोटी संघाचा नवा उपकर्णधार आहे. याशिवाय, करुण नायर आठ वर्षांनी भारतीय संघात परतला आहे. शार्दुल ठाकूर देखील भारतीय संघात परतत आहे. बीसीसीआयने रात्री उशिरा निघालेल्या खेळाडूंचे अनेक फोटो सोशल मीडिया हँडलवर शेअर केले. खेळाडू व्यतिरिक्त, प्रशिक्षकही आत्मविश्वासाने भरलेले दिसून आले.

पाच सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत कर्णधार शुभमन गिल म्हणाले, ‘मला कर्णधार बनवण्यात आले आहे. ही एक मोठी जबाबदारी आहे. मी त्यासाठी तयार आहे.’ गिल म्हणाला की संघ व्यवस्थापन फलंदाजी क्रम निश्चित करण्याबाबत लवकरच निर्णय घेईल. आमच्याकडे अजूनही वेळ आहे. आमच्याकडे अनुभवी गोलंदाज देखील आहेत. जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीशी संबंधित प्रश्नावर प्रशिक्षक गौतम गंभीर म्हणाले, बुमराहची जागा घेणे खूप कठीण आहे. परंतु आमच्याकडे अधिक गोलंदाज आहेत. तो कोणत्या सामन्यापासून खेळायला सुरुवात करेल हे आम्ही अद्याप ठरवलेले नाही.