२०३० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारताची बोली

  • By admin
  • June 8, 2025
  • 0
  • 3 Views
Spread the love

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे शिष्टमंडळ अधिकाऱयांना भेटले

नवी दिल्ली ः भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळवण्यासाठी आपले प्रयत्न तीव्र केले आहेत. यजमानपद मिळवण्यासाठी प्रक्रिया आणि पद्धती चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आयओए, केंद्र आणि गुजरात सरकारचे एक शिष्टमंडळ लंडनमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अधिकाऱ्यांना भेटले आहे.

नोव्हेंबरमध्ये यजमान शहर निवडले जाणार
शिष्टमंडळात आयओए प्रमुख पीटी उषा आणि केंद्रीय क्रीडा मंत्रालय तसेच गुजरात राज्य सरकारचे अधिकारी होते. त्यांनी लंडनमध्ये दोन दिवस राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अधिकाऱ्यांना भेटले. बोलीच्या अंतिम बोलीसाठी प्रस्ताव ३१ ऑगस्टपर्यंत सादर होण्याची अपेक्षा आहे तर २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी यजमान शहराची निवड या वर्षी नोव्हेंबरमध्ये केली जाईल.

भारताने औपचारिकपणे बोली सादर केली
भारताने अहमदाबादमध्ये २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळविण्यासाठी औपचारिकपणे बोली सादर केली आहे. २०३६ मध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. गुजरात क्रीडा मंत्रालयाने सांगितले की, लंडनमधील दोन दिवसांच्या काळात भारतीय शिष्टमंडळाने बैठकांमध्ये विस्तृत चर्चा केली आणि बोली प्रक्रियेसंदर्भात आतापर्यंत केलेल्या तयारीचे सादरीकरण केले. राष्ट्रकुल क्रीडा संघाने सांगितले की ते इच्छुक यजमान शहरांना प्रस्ताव तयार करण्यात पूर्ण सहकार्य आणि पाठिंबा देईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *