जलतरण साक्षरतेची शपथ घेऊन जागतिक जलतरण साक्षरता दिन साजरा 

  • By admin
  • June 14, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशन च्या वतीने १५ जून जागतिक जलतरण साक्षरता दिनाचे औचित्य साधून जलतरण साक्षरतेची शपथ हर्सुल तलाव या ठिकाणी आवाज दो या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.  

डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार दररोज साधारणः ६०० ते ६५० लोक पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडतात. यात सर्वाधिक प्रमाण हे शालेय विद्यार्थ्यांचे आहे असे डब्ल्यूएचओच्या अधिकृत सर्वेक्षणात म्हटले आहे. पाण्यात बुडून मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. याचे एकमेव कारण म्हणजे योग्य माहितीचा अभाव आहे. म्हणूनच राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनच्या वतीने शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन तरुणांना जलतरणपूर्वी जल म्हणजे पाणी आणि पाणी म्हणजे जलस्रोत याची सखोल माहिती दिली जाईल.  मग ते नैसर्गिक असो वा मानव निर्मित कृत्रिम अशा सर्वच छोट्या-मोठ्या जलस्त्रोतांची माहिती उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आवाज दो उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ही माहिती विद्यार्थ्यांना प्रथमतः विविध प्रकारच्या जलस्त्रोतांची माहिती ही शाळेच्या आवारात तोंडी, चित्र स्वरूपात, किंवा टीव्ही, प्रोजेक्टर, लॅपटॉप इत्यादी उपकरणांवर जरी दाखवले तरी बऱ्याच अंशी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल.

प्रत्येकाला जल व तरणाची माहिती मार्गदर्शन, समुपदेशन, शिक्षण व प्रशिक्षण हाच महत्व पूर्ण हेतू – उद्देश घेऊन राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशन कार्यरत आहे. कारण आज प्रत्येक विद्यार्थी हा टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर सारख्या गॅजेटच्या नादी लागल्यामुळे त्याचा निसर्गाशी संबंध कमी झाला आहे. म्हणून आड, विहीर, बारव,
नदी, नाला, ओढा, बांध, बंधारा, चारी, पाट, कालवा, तळे, तलाव, सरोवर, सिंचन प्रकल्प, धबधबा, खाडी, समुद्र इत्यादी विविध प्रकारच्या जलस्त्रोतांची संपूर्ण माहिती
विद्यार्थ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचवल्यास होण्याऱ्या संभाव्य घटना आपल्याला बऱ्यापैकी टाळता येतील.

जलस्त्रोतांची नैसर्गिक रचना, त्यांची लांबी-रुंदी-खोली इत्यादी विषयी पूर्व कल्पना किंवा सखोल माहिती आपण आवाज दो उपक्रमा अंतर्गत करणार आहोत. जागतिक जलतरण साक्षरता दिनाच्या एक दिवस आधी शनिवारी (१४ जून) सकाळी सात वाजता हर्सुल तलाव या नैसर्गिक जलस्त्रोतावर शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन तरुणांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन जलतरण साक्षरतेची शपथ घेतली.

या प्रसंगी जागतिक जलतरण साक्षरतेचे संकल्पक व एमजीएम स्पार्ट्स कल्बचे आंतरराष्ट्रीय जलतरणपटू व प्रशिक्षक राजेश भोसले यांनी जलतरण साक्षरता म्हणजे काय, जलतरण साक्षरता काळाची गरज का आहे याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.

त्यानंतर राष्ट्रीय महिला जलतरण साक्षरता मिशनच्या प्रमुख व राष्ट्रीय जलतरणपटू तथा प्रशिक्षक अंजूषा मगर, वंदना वाघमोडे, पौर्णिमा भोसले, विजय भोसले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना जलतरण साक्षरतेची शपथ दिली.

या प्रसंगी राजमाता जिजाऊ महिला प्रशिक्षण केंद्राच्या संचालिका नेहा वायभट, प्रशिक्षक कृष्णा पानखडे, योद्धा करियर अकॅडमीचे संचालक सचिन मोहिते, युनिक करियर अकॅडमीचे संचालक मंजूर मदार आदी उपस्थित होते.

“आवाज दो” म्हणजे तरणापूर्वी म्हणजेच जलतरण शिकण्यापूर्वी महाराष्ट्रातील प्रत्येक  शाळेत व शालेय विद्यार्थ्यांस जल व जलस्त्रोताची माहिती पोहचविण्यासाठी राष्ट्रीय जलतरण साक्षरता मिशनचे मोहन सोनवणे, अशोक जगताप, पंडीत पळसकर, रविंद्र निकम, प्रशांत झाला, जयंत देशपांडे, अशोक काळे, डॉ विजय व्यवहारे, संतोष जोशी, रमेश शिंदे, राजेंद्र काळे, गोपालकृष्ण नवले आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *