पावसामुळे रायगड रॉयल्स व रत्नागिरी जेट्स यांच्यातील लढत रद्द

  • By admin
  • June 16, 2025
  • 0
  • 17 Views
Spread the love

पुणे ः महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत रायगड रॉयल्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स यांच्यातील साखळी फेरीतील २१वी लढत पावसामुळे रद्द करण्यात आली.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत गुणतालिकेत रायगड रॉयल्स संघ ६ सामन्यात ३ विजय, ३ पराभव व ६ गुणांसह तिसऱ्या स्थानी, तर रत्नागिरी जेट्स संघ ६ सामन्यात २ विजय, ४ पराभव व ४ गुणांसह पाचव्या स्थानी आहेत. दोन्ही संघांचे साखळी फेरीच्या आणखी तीन सामने शिल्लक आहेत. याआधीच्या लढतीत रत्नागिरी जेट्स संघाला सातारा वॉरियर्स संघाकडून डकवर्थ लुईस नुसार १४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. प्लेऑफ साठी पात्र होण्याच्या दृष्टीने त्यांना उर्वरित सामन्यात विजय मिळवणे क्रमप्राप्त आहे.

गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर असलेल्या ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स यांच्यातील दुपारची लढत सततच्या पडत असलेल्या पावसामुळे रद्द करण्यात आली. काल झालेल्या लढतीत कर्णधार राहुल त्रिपाठी याने केलेल्या सुरेख फलंदाजीसह आनंद ठेंगे (४-२९) याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा गडी राखून पराभव करत दुसरा विजय मिळवला. गुणतालिकेत ईगल नाशिक टायटन्स संघ ६ सामन्यात ५ विजय, १ पराभव व १० गुणांसह अव्वल स्थानी आहेत. पीबीजी कोल्हापूर टस्कर्स ६ सामन्यात २विजय, ३ पराभव ५ गुणांसह चौथ्या स्थानी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *