
हेडिंग्ले ः भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला शुक्रवारी सुरुवात झाली. ही मालिका आता तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी म्हणून ओळखली जाणार आहे. या ट्रॉफीचे अनावरण करताना सचिन तेंडुलकर याने भारतीय संघ ही मालिका ३-१ अशी जिंकेल असे भाकीत केले आहे.
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने मी भारतीय संघासाठी ३-१ असा अंदाज वर्तवला असल्याचे सांगितले. २००७ मध्ये भारतीय संघाने इंग्लंड भूमीत शेवटची मालिका जिंकली होती. या ऐतहासिक विजयाचा साक्षीदार सचिन तेंडुलकर राहिलेला आहे.
२००७ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर संघाने शेवटचे जेतेपद जिंकले होते. सचिन स्वतः त्या विजयाचा साक्षीदार आहे. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आणि त्यांच्याच मैदानावर इंग्लिश संघाचा पराभव केला. तेव्हापासून भारतीय संघ तिथे विजयासाठी आसुसलेला आहे.
सध्या भारतीय संघ बदलाच्या टप्प्यातून जात आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन सारख्या अनुभवी खेळाडूंनी कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. त्यांच्या जागी समाविष्ट झालेल्या खेळाडूंना इंग्लंडच्या भूमीवर कामगिरी करण्याचा फारसा किंवा अजिबात अनुभव नाही. त्यामुळेच यावेळी क्रिकेट तज्ञ संघाच्या कामगिरीबद्दल थोडे घाबरले आहेत.