५८ वर्षांनी भारताचा ऐतिहासिक विजय 

  • By admin
  • July 6, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

– इंग्लंडचा तब्बल ३३६ धावांनी पराभव

– एजबॅस्टनवर कसोटी जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार शुभमन गिल

– आकाश दीपचे सामन्यात दहा विकेट 

एजबॅस्टन : अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेतील दुसरा कसोटी सामना भारतीय संघाने जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने एजबॅस्टन मैदानावर पहिल्यांदा कसोटी सामना जिंकून इंग्लंडचा घमंड मोडीत काढला. आकाश दीप याने दुसऱ्या डावात सहा विकेट घेऊन भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयात मोलाचा वाटा उचलला. भारतीय संघाने तब्बल ५८ वर्षांनी एजबॅस्टन कसोटी ३३६ धावांनी जिंकून एक नवा इतिहास रचला आहे. भारताच्या या विक्रमी विजयाने इंग्लंड संघाचा या मैदानावरील दबदबा संपुष्टात आला. 

एजबॅस्टन मैदानावर १९६७ पासून भारतीय संघाने कसोटी सामना जिंकलेला नव्हता. या मैदानावर कसोटी जिंकणारा भारतीय संघ हा पहिला आशियाई संघ देखील बनला आहे. या मैदानावर पाकिस्तान आणि श्रीलंका संघाला देखील कसोटी सामना जिंकता आलेला नाही. 

आकाश दीपच्या गोलंदाजीवर ब्रायडन कार्स याचा झेल घेऊन कर्णधार शुभमन गिल याने भारतीय संघाच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केले. हा कसोटी सामना शुभमन गिलच्या शानदार कामगिरीमुळे कायम स्मरणात राहणार आहे. गिल याने या कसोटीत तब्बल ४३० धावा काढल्या आहेत. द्विशतक आणि दीडशतक अशी संस्मरणीय कामगिरी बजावत शुभमन गिल याने भारताला एजबॅस्टन कसोटीत विजय मिळवून दिला. बर्मिंगहॅममध्ये भारताला पहिला कसोटी विजय मिळवून देणारा गिल हा पहिला कर्णधार बनला आहे. यापूर्वी, भारताने येथे ८ कसोटी सामने खेळले होते, त्यापैकी ७ सामने त्यांना गमावले आहेत.

भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा ३३६ धावांनी पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. बर्मिंगहॅममध्ये भारताने पहिल्यांदा कसोटी विजय मिळवला आहे. भारताने पहिल्या डावात ५८७ धावा केल्या आणि इंग्लंडला ४०७ धावांवर गुंडाळून १८० धावांची मोठी आघाडी घेतली. शुभमन गिलच्या शतकाच्या मदतीने भारताने दुसरा डाव ६ बाद ४२७ धावांवर घोषित केला आणि इंग्लंडसमोर ६०८ धावांचे लक्ष्य ठेवले, ज्यामुळे एकूण ६०७ धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडचा दुसरा डाव पाचव्या दिवशी २७१ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने विजय मिळवला.

पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे उशिरा सुरू झाला, परंतु आकाश दीपने सुरुवातीला इंग्लंडला दोन धक्के दिले. त्यानंतर बेन स्टोक्सने जेमी स्मिथसह डावाची सूत्रे हाती घेतली आणि सहाव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदर याने स्टोक्सला शानदार चेंडूवर पायचीत बाद करून ही भागीदारी मोडली. स्टोक्सची विकेट पडताच लंच ब्रेक जाहीर करण्यात आला. दुसऱ्या सत्रात मात्र भारताने उर्वरित चार विकेट घेतल्या आणि सामना संपवला. भारताकडून वेगवान गोलंदाज आकाश दीपने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आणि दुसऱ्या डावात सहा विकेट घेतल्या. आकाशने पहिल्या डावात चार विकेट घेतल्या होत्या. आकाश व्यतिरिक्त मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

दुसऱ्या सत्रात इंग्लंडने ख्रिस वोक्स (७), जेमी स्मिथ (८८), जोश टंग (२) आणि ब्रायडन कार्स (३८) यांचे विकेट गमावले. शोएब बशीर १२ धावा काढून नाबाद परतला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात यष्टीरक्षक फलंदाज जेम स्मिथने शानदार कामगिरी केली आणि अर्धशतक झळकावले. भारत आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना १० जुलैपासून लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाईल.

आकाश दीप घातक गोलंदाजी 

आकाश दीप याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी केली आणि त्याने ९९ धावांत ६ विकेट्स घेतल्या. कसोटी कारकिर्दीतील हा त्याचा पहिलाच पाच विकेट्सचा विक्रम आहे. त्याने इंग्लंडच्या फलंदाजांना क्रीजवर राहण्याची संधी दिली नाही. जसप्रीत बुमराह याला विश्रांती देताना आकाश दीप याला खेळण्याची संधी दिली गेली. आकाश दीप याने मिळालेल्या या संधीचे सोने करताना कसोटीत दहा विकेट घेऊन भारताला अजरामर विजय मिळवून दिला आहे. खास करुन दुसऱ्या डावात आकाश दीप याने इंग्लंडला ज्या प्रकारे हादरे दिले त्यामुळे इंग्लंड संघ सावरू शकला नाही. पहिल्या डावात सिराजने सहा विकेट घेतल्या होत्या. आकाश दीपने चार विकेट घेऊन सिराजला सुरेख साथ दिली होती.  

शुभमन सर्वात तरुण कर्णधार

२५ वर्षे आणि ३०१ दिवसांचा शुभमन गिल परदेशात कसोटी जिंकणारा सर्वात तरुण भारतीय कर्णधार बनला आहे. याआधी सुनील गावसकर (२६ वर्षे २०२ दिवस) यांनी १९७६ मध्ये ऑकलंडमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला होता.

गोलंदाजी-क्षेत्ररक्षण जबरदस्त होते – शुभमन गिल 

पहिल्या सामन्यानंतर आम्ही ज्या गोष्टींबद्दल बोललो, त्यात आम्ही अचूक होतो. आमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण जबरदस्त होते. आम्हाला माहित होते की जर आम्ही अशा प्रकारच्या विकेटवर ४००-५०० धावा केल्या तर आम्ही खेळात असू. प्रत्येक वेळी आम्ही इतके झेल सोडणार नाही. त्याने इतक्या मनापासून गोलंदाजी केली. त्याने ज्या क्षेत्रांमध्ये आणि लांबीवर मारले, तो चेंडू दोन्ही बाजूंनी हलवत होता. अशा विकेटवर, ते करणे कठीण आहे. मी म्हणेन की मला माझ्या खेळात आरामदायी वाटत आहे. जर आम्ही माझ्या योगदानाने मालिका जिंकली तर मला अधिक आनंद होईल. मी हे आधी सांगितले आहे, फलंदाज म्हणून खेळायचे आहे, फलंदाज म्हणून विचार करायचे आहे. निश्चित (बुमराह लॉर्ड्सवर परतणार?). त्यासाठी खूप उत्सुक. कदाचित जगातील सर्वात प्रतिष्ठित स्टेडियम. लहानपणी तुम्ही त्याचे स्वप्न पाहता.

 आम्ही सर्व करुण पाहिले – बेन स्टोक्स 

कठीण. दोन क्षण. त्यांना २००/५ वर असणे आणि त्यांना उघडपणे फोडू न शकणे. आणि नंतर ८०/५ असणे. तिथून परत येणे कठीण होणार होते. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे, २००/५ असा संघ असल्याने तुम्ही एका कमांडिंग स्थितीत असता. पण जसजसे ते खोलवर जात गेले तसतसे विकेट आम्ही ज्या पद्धतीने खेळलो त्याप्रमाणे अपेक्षित नव्हती. कदाचित ती भारताला जास्त अनुकूल होती. आम्ही सर्व काही करून पाहिले, योजना बदलल्या, पण जेव्हा एखादा संघ तुमच्यावर असतो तेव्हा त्याला परत आणणे कठीण होते. शुभमनने फलंदाजी करताना अविश्वसनीय खेळ केला. दिवसाच्या शेवटी फलंदाजी करताना नेहमीच कठीण स्थिती असते. जेमी संघात आल्यापासून अविश्वसनीय आहे. त्याच्या कीपिंगमुळे तो रडारवर येतो जे तुम्हाला एका कीपरकडून हवे असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *