< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); ऑस्ट्रेलियाची टी २० क्रिकेटमध्ये भारताच्या विश्वविक्रमाची बरोबरी – Sport Splus

ऑस्ट्रेलियाची टी २० क्रिकेटमध्ये भारताच्या विश्वविक्रमाची बरोबरी

  • By admin
  • July 27, 2025
  • 0
  • 5 Views
Spread the love

वेस्ट इंडिज संघावर तीन विकेटने मात

सेंट किट्स ः ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा चौथा टी २० सामना तीन विकेट्सने जिंकला. यासह, ऑस्ट्रेलिया संघाने टी २० मालिकेत ४-० अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या सलग चौथ्या टी-२० विजयात कॅमेरॉन ग्रीन, जोश इंगलिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कॅमेरॉन ग्रीन आणि जोश इंगलिस यांनी अर्धशतके झळकावली तर ग्लेन मॅक्सवेलने १८ चेंडूत जलद ४७ धावा केल्या. या डावात त्याने ६ षटकार आणि १ चौकार मारला. मॅक्सवेलला त्याच्या अद्भुत खेळीसाठी सामनावीर म्हणून निवडण्यात आले.

सेंट किट्समध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाने ९ विकेट्स गमावून २०५ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलियाने १९.२ षटकांत २०६ धावांचे लक्ष्य गाठले. अशाप्रकारे, ऑस्ट्रेलियाने सलग दुसऱ्या सामन्यात २०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठून भारतीय संघाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे.

भारताच्या विश्वविक्रमाला धोका
ऑस्ट्रेलियाने टी २० क्रिकेटच्या इतिहासात सातव्यांदा २०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठले. यासह, ऑस्ट्रेलियन संघाने टी २० मध्ये सर्वाधिक ७ वेळा २०० प्लस धावांचे लक्ष्य गाठण्याच्या विश्व विक्रमाशी बरोबरी केली. यापूर्वी, भारत हा एकमेव संघ होता ज्याने टी २० मध्ये ७ वेळा २०० प्लस धावांचे लक्ष्य गाठण्याचा पराक्रम केला होता. आता ऑस्ट्रेलिया आणि भारत दोघांच्याही नावावर प्रत्येकी ७ वेळा २०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठण्याचा विक्रम आहे. जर ऑस्ट्रेलियन संघ मालिकेतील शेवटच्या आणि ५ व्या सामन्यात २०० पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठण्यात यशस्वी झाला तर टीम इंडियाचा विश्वविक्रम मोडला जाईल.

यजमान संघ पहिल्या विजयाच्या शोधात
वेस्ट इंडिज दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. कसोटी मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप केल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने आता ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत ४-० अशी निर्णायक आघाडी घेतली आहे. आता कांगारू संघ कसोटी मालिकेप्रमाणे टी-२० मालिकेत वेस्ट इंडिजचा क्लीन स्वीप करण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटच्या सामन्यात, यजमान वेस्ट इंडिज कोणत्याही किंमतीत जिंकू इच्छित असेल.

टी २० मध्ये सर्वाधिक वेळा २०० प्लस धावांचे लक्ष्य गाठणारे संघ

भारत – ७
ऑस्ट्रेलिया – ७
दक्षिण आफ्रिका – ५
बल्गेरिया – ५
पाकिस्तान – ४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *