कोणताही खेळाडू देशांतर्गत क्रिकेट हलक्यात घेत नाही : रोहित शर्मा

  • By admin
  • January 19, 2025
  • 0
  • 36 Views
Spread the love

मुंबई : कोणताही खेळाडू देशांतर्गत रेड बॉल स्पर्धा हलक्यात घेत नाही. व्यस्त आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमुळे स्टार खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी वेळ काढणे कठीण होते असे सांगत भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने मुंबई संघाकडून जम्मू-काश्मीर संघाविरुद्ध रणजी सामना खेळणार असल्याचे स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत रोहित शर्माला रणजी ट्रॉफी सामन्यासाठी त्याच्या उपलब्धतेबद्दल विचारण्यात आले तेव्हा रोहितने होकारार्थी उत्तर दिले. रोहित म्हणाला, जर तुम्ही गेल्या सहा-सात वर्षांचे आमचे कॅलेंडर पाहिले तर असे कधीच घडले नाही की आम्ही ४५ दिवस घरी राहिलो. आयपीएल संपल्यानंतर लगेचच कोणताही आंतरराष्ट्रीय सामना नसतो तेव्हाच हे घडते. आमचा देशांतर्गत हंगाम ऑक्टोबरमध्ये सुरू होतो आणि मार्चपर्यंत चालतो. जे खेळाडू राष्ट्रीय संघासाठी सर्व फॉरमॅटमध्ये खेळत नाहीत आणि जेव्हा देशांतर्गत क्रिकेट सुरू असते तेव्हा ते त्यात खेळू शकतात.’

भारतीय कर्णधार रोहित म्हणाला की, ‘जर मी स्वतःबद्दल बोललो तर मी २०१९ पासून नियमितपणे कसोटी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला वेळच मिळत नाही. जेव्हा तुम्ही नियमितपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला स्वतःला ताजेतवाने करण्यासाठी वेळ हवा असतो. असे नाही की कोणीही देशांतर्गत क्रिकेटला हलके घेत आहे.’

रोहितचा खराब कसोटी फॉर्म
३७ वर्षीय रोहितने गेल्या १५ डावांमध्ये फक्त एक अर्धशतक झळकावूनही कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्यास नकार दिला होता. मंगळवारी रोहितने वानखेडे स्टेडियमवर मुंबई संघासोबत सराव केला. अलिकडच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहितला वाईट कामगिरी करता आली नाही. तीन सामन्यांच्या पाच डावात तो फक्त ३१ धावा करू शकला. खराब फॉर्ममुळे तो पाच सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा कसोटी सामना खेळू शकला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *