
नांदेड ः नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेला नांदेड शहरात प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत देशभरातू ३१ राज्यातील खेळाडू सहभागी झाले आहेत.
जिल्हा क्रीडा संकुलातील इनडोअर हॉल येथे ही स्पर्धा होत आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा कोषागार अधिकारी अलंकृता कश्यप-बगाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे, एसजीएफआयचे निरीक्षक निखिल, नांदेड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव दिनकर हंबर्डे, मुख्य आर्बिटर प्रवीण ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की, बुद्धिबळ हा खेळ बौद्धिक विकास घडवून आणतो व आपल्या पूर्वजांपासून म्हणजेच राजे-महाराजे यांच्याकडून खेळत आलेला हा खेळ आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी भविष्यात निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळ खेळून आपल्या देशाचे नावलौकिक करतील अशी आशा बाळगून उपस्थित सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी जयकुमार टेंभरे यांनी प्रास्ताविक केले. या राष्ट्रीय स्पर्धेकरीता आमदार आनंद तिडके यांनी सदिच्छा भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेत पंच म्हणून अमरीश जोशी, शार्दुल तापसे, भूपेंद्र पटेल, पल्लवी कदम, सुचिता हंबर्डे, गगनदीपसिंग रंधावा (नांदेड), शिषीर इंदुरकर, नथ्थु सोमवंशी, चैतन्य गोरवे, सिद्धार्थ हटकर, प्रशांत सूर्यवंशी, ऋतुजा कुलकर्णी आदी काम करीत आहेत.
स्पर्धेचे सूत्रसंचालन इम्तियाज खान यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल श्रीरामवार यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करणेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमर टेंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, शिवकांता देशमुख, निळकंठ श्रावण, राहुल श्रीरामवार, विपुल दापके, संतोष कनकावार, दत्तकुमार धुतडे, संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनुमंत नरवाडे, वैभव दोमकोंडवार, ज्ञानेश्वर सोनसळे, सुशील कुरुडे, कपिल सोनकांबळे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, शेख इकरम, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे व बुद्धिबळ असोसिएशनचे पदाधिकारी व खेळाडूं आदींनी पुढाकार घेतला आहे.