भारतीय संघाला रोखणे आता कठीण ः वसीम अक्रम 

  • By admin
  • March 3, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

दुबई ः चार फिरकीपटू खेळवण्याचा निर्णय घेऊन भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला पराभूत केले. भारतीय संघाचे कौतुक करावे तेवढे पुरेसे ठरणार नाही. आता भारतीय संघाला रोखणे कठीण आहे, असे मत पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम याने व्यक्त केले आहे. 

टेन स्पोर्ट्सवर बोलताना वसीम अक्रम म्हणाला की, भारतीय संघाचे कौतुक करावे तेवढे पुरेसे नाही, त्यांनी सर्व सामने जिंकले आहेत. त्यांचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. आयसीसी विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, भारताने १४ पैकी १३ सामने जिंकले आहेत, फक्त एकच हरला आहे आणि तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध होता. यावरून भारतीय संघाची किती सखोलता आहे हे दिसून येते.

वसीम अक्रम पुढे म्हणाला, भारतीय संघाचा आत्मविश्वास शिखरावर आहे. त्यांच्याकडे आत्मविश्वास आहे आणि त्यांनी विकेटचे चांगले विश्लेषण केले आहे. त्यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये चार फिरकीपटूंचा समावेश केला. त्यांच्या या निर्णयावरही प्रश्न उपस्थित झाले. सर्वांनी म्हटले की चार फिरकीपटूंना संघात एकत्र ठेवायला नको होते. दुसरा वेगवान गोलंदाज भारतीय संघात असायला हवा होता. पण भारताला त्याची गरज नव्हती. भारतीय संघ अजूनही अजिंक्य आहे.

माजी पाकिस्तानी गोलंदाज वसीम अक्रम पुढे म्हणाला की, भारतीय फिरकीपटूंनी शानदार गोलंदाजी केली आणि न्यूझीलंडच्या फलंदाजांवर भारतीय फिरकीपटूंचा दबाव आला. या सामन्यात किवी संघाचे हेच कारण होते. आता ४ मार्च रोजी भारतीय संघ सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाशी सामना करणार आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *