टी २० क्रिकेट स्पर्धेत अरुप्रीत टायगर्स अंतिम फेरीत 

  • By admin
  • March 12, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

मुंबई : इंशुरन्स शील्ड टी २० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अरुप्रीत टायगर्स संघाने एकतर्फी विजय प्राप्त करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यांनी बेस्ट संघाला ११७ धावांनी पराभूत करत अंतिम फेरीचे तिकीट मिळवले.

अरुप्रीत टायगर्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १८२ धावा केल्या. निखिल पाटील (४०) आणि प्रथमेश चव्हाण (नाबाद ४३) यांनी मधल्या फळीतील आक्रमक फटकेबाजीने संघाला मोठ्या धावा मिळवून दिल्या. शंतनू नायक (३२) आणि सिद्धेश गवंडे (२९) यांच्या योगदानामुळे अरुप्रीत टायगर्स १८० धावांच्या पार आल्याने त्यांचा संघ मजबूत स्थितीत आला.

बेस्टला १८३ धावांचे मोठे आव्हान पेलवता आले नाही आणि त्यांचा डाव १४.३ षटकांत ६५ धावांवर आटोपला. सिमंत दुबेने (२-२३) तीन विकेट्स घेत बेस्टच्या फलंदाजांना धडकी भरवली, तर अनझर मिर्झा (२-१४), पियुष कनोजिया (२-१३), आणि सिद्धेश दवंड (४-२) यांनीही चमकदार गोलंदाजी केली. बेस्ट संघातील नीलेश करमाळे (२४) आणि सुनील राउत (११) यांनाच दोन आकडी धावा करता आल्या.

अरुप्रीत टायगर्स संघाच्या विजयात सिमंत दुबेच्या गोलंदाजीने महत्त्वाची भूमिका निभावली तर निखिल पाटील आणि प्रथमेश चव्हाणच्या फटकेबाजीमुळे त्यांच्या संघाने निर्णायक विजय मिळवला.

तत्पूर्वी, दुसऱ्या लढतीत मुंबई पोलीस स्पोर्ट्स क्लबने जीआयसी स्पोर्ट्स क्लब संघाला ३५ धावांनी हरवले. मुंबई पोलीस एससी संघाने २० षटकांत १४६ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर जीआयसी एससी १११ धावांपर्यंतच पोहोचू शकले.

संक्षिप्त धावफलक ः १) अरुप्रीत टायगर्स : २० षटकांत ५ बाद १८२ (निखिल पाटील ४०, प्रथमेश चव्हाण नाबाद ४३, शंतनू नायक ३२, सिद्धेश गवंडे २९, किरण खानविलकर २-४६) विजयी विरुद्ध बेस्ट : १४.३ षटकांत सर्वबाद ६५ (नीलेश करमाळे २४, सुनील राउत ११, सिमंत दुबे ३-२३, अनझर मिर्झा २-१४, पियुष कनोजिया १-१३, सिद्धेश दवंड ४-२).

२) मुंबई पोलीस एससी : २० षटकांत सर्वबाद १४६ (जयेश चांदोरकर ४९, निशित भल्ला २१, हमजा शेख ३-१९, कडियन २-२१) विजयी विरुद्ध जीआयसी एससी : २० षटकांत ८ बाद १११ (सुमीत सोलकर ४३, निशित भल्ला ३-२०, रोहित भेरे २-१८, स्वप्नील कुळ्ये २-२९).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *