एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेत एमसीए अकादमी ब संघ विजेता

  • By admin
  • June 2, 2025
  • 0
  • 4 Views
Spread the love

मुंबई ः पार्थ म्हात्रे आणि विराट यादव यांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर एमसीए अकादमी ब केंद्राने कांदिवली केंद्राचा विजयी वारू रोखत ३३व्या एलआयसी एमसीए कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर नाव कोरले.

मुंबईसह राज्यात मान्सूनचे १० ते १२ दिवस आधीच आगमन झाल्यामुळे कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेचे सामने दोन दिवसांऐवजी ५० षटकांचे खेळवण्यात आले. कल्पेश गोविंद कोळी स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अंतिम सामना माटुंग्याच्या मेजर दडकर मैदानाऐवजी इतरत्र खेळवण्यात आला. डहाणूच्या अदानी क्रिकेट स्टेडियमच्या मैदानावर अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एमसीए अकादमी ब केंद्राने ५० षटकांत ९ बाद १९८ धावा केल्या. हे आव्हान कांदिवली केंद्राला पेलवले नाही.त्यांचा डाव ४० षटकांत १५१ धावांवरच संपुष्टात आला.

अदानीचे मानव संसाधन व प्रशासन विभागाचे प्रमुख नित्यानंद तिवारी यांनी अंतिम सामन्याचे उद्घाटन केल्यानंतर चुरशीच्या झालेल्या या सामन्यात एमसीए अकादमी केंद्राचा डाव ५ बाद ९२ अशा बिकट अवस्थेत असताना विराट यादव आणि पार्थ म्हात्रे यांनी सहाव्या विकेटसाठी ७५ धावांची भागीदारी रचत त्यांच्या डावाला आकार दिला. पार्थ म्हात्रेने ५१ धावांची खेळी साकारली. त्याला विराट यादव (४२) आणि कुशल पाटील (३७) यांनी मोलाची साथ दिली.

एमसीए अकादमी ब केंद्राने विजयासाठी ठेवलेले १९८ धावांचे लक्ष्य पार करताना कांदिवली केंद्राने दमदार सुरुवात केली. संपूर्ण स्पर्धेत दमदार खेळी करणाऱ्या युग असोपाने या सामन्यातही छाप पाडली. युग असोपा ४९ धावांवर खेळत असताना, कुशल पाटीलने त्याचा अप्रतिम झेल टिपला अन् सामन्याला कलाटणी मिळाली. ३ बाद ८८ धावसंख्येवरून कांदिवली केंद्राचा डाव १५१ धावांवरच गडगडला. विराट यादवने तीन तर शिव त्रिपाठी आणि नारायण ठाकूर यांनी प्रत्येकी २ बळी मिळवत विजयात मोलाचे योगदान दिले. अंतिम सामन्याचा मानकरी विराट यादव ठरला तर स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराने कांदिवली केंद्राच्या युग असोपाला गौरवण्यात आले.

न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब आणि कल्पेश गोविंद कोळी स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेच्या संयोजन समितीकडून दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार मुंबईचे माजी क्रिकेटपटू दयानंद (दया) दुधवडकर यांना प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व्ही व्ही करमरकर यांच्या नावाने दिला जाणाऱ्या पुरस्काराने यंदा एबीपी माझाचे क्रीडा प्रतिनिधी विजय साळवी यांना गौरवण्यात आले.

स्पर्धेतील मानकरी

अंतिम सामनावीर : विराट यादव (एमसीए अकादमी ब केंद्र)
सर्वोत्तम फलंदाज : अरहान पटेल (पालघर-बोईसर केंद्र)
सर्वोत्तम गोलंदाज : विराट यादव (एमसीए अकादमी ब केंद्र)
सर्वोत्तम यष्टीरक्षक : जन्मय पाटील (एमसीए अकादमी ब केंद्र)
उदयोन्मुख वेगवान गोलंदाज : शिव त्रिपाठी (एमसीए अकादमी ब केंद्र)
उदयोन्मुख सर्वोत्तम फलंदाज : हर्ष कदम (ठाणे अ केंद्र)
हॅटट्रिकवीर : श्लोक कडव (घाटकोपर केंद्र)
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : युग असोपा (कांदिवली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *