
आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने देशभर क्रिकेटचे वातावरण तयार झाले होते. आता आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे मुंबई टी २० क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे. डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा रंगत आहे.
देशांतर्गत क्रिकेटचा विचार केला तर अनेक मोठ्या स्पर्धा संपन्न झाल्या. लहान वयोगटातील मुलांचा सहभाग असलेल्या क्रिकेट स्पर्धा व शिबिरांचे आयोजन मुंबई क्रिकेट असोसिएशन द्वारा करण्यात आले होते.
उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबीर अगदी चांगल्या प्रकारे वेळेचे नियोजन करून अनेक स्पर्धा संपन्न करण्यात सर्व संस्थांना यश मिळाले. आपण मुंबई क्रिकेटचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की मुंबई क्रिकेट असोसिएशनने अतिशय चांगल्या प्रकारे अनेक स्पर्धा व उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबीर कमी कालावधीत पूर्ण केले. तसेच कल्याण येथे असलेले संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी कल्याण यांनी विविध वयोगटातील तिन्ही स्पर्धांचे आयोजन केले होते. तेही चांगल्या प्रकारे संपन्न झाले.
आता मात्र पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात मैदानी क्रीडा स्पर्धांना ब्रेक लागतो. इनडोअर क्रीडा प्रकार सुरू राहतात. काही प्रमाणात क्रिकेट देखिल इनडोअर खेळवला जाईल. पावसाळ्यात जवळ जवळ सर्वच मैदानी क्रिकेट स्पर्धा बंद होतात. म्हणून खेळाडूंनी या कालावधीचा चांगला प्रकारे उपयोग आपल्या क्रिकेट व फिटनेसवर भर देऊन लक्ष दिले पाहिजे. क्रिकेटपटूंसाठी आपल्या तंत्र आणि फिटनेसवर भर देण्यासाठी हा योग्य कालावधी असतो. म्हणून याचा विचार करत जुलै महिन्यापासून संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीने आपल्या क्लबच्या मुलांसाठी मान्सून इनडोअर क्रिकेट कोचिंग सुरू करण्याचे ठरवले आहे. याचा प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्यांचा असणार व या इनडोअरमध्ये सर्व मुलांच्या क्रिकेटचे तंत्र व फिटनेसवर लक्ष देण्यात येईल.
या विषयावर संतोष पाठक म्हणाले की, सहा ते आठ महिन्यांपासून सुरू असलेली क्रिकेटची दमछाक मे महिन्याच्या अखेरीस कमी होते आणि पावसाळ्या दरम्यान खेळाडूंना आपल्या वैयक्तिक तंत्रावर भर देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असतो. त्याच प्रकारे आपल्या फिटनेसवर म्हणजे तंदुरुस्तीकडे लक्ष देण्यासाठी देखिल खेळाडूंना पुरेसा वेळ मिळत असतो. या वेळेचा सदुपयोग प्रत्येकाने करावा जेणेकरून क्रिकेटचा सीजन पूर्णतः सुरू होईल त्या वेळेपर्यंत आपला फिटनेस उच्च दर्जाचा बनवता येईल, फिटनेस चांगला करण्यासाठी दोन-चार दिवसांचा कालावधी पुरेसा नसतो, ती अनेक महिन्यांची तपस्या असते आणि म्हणूनच जेव्हा आपल्याला वेळ मिळतो तेव्हा त्या वेळेचा सदुपयोग करून आपण आपल्या फिटनेसवर लक्ष दिले पाहिजे. कारण फिटनेस चांगला असेल तर त्या खेळाडूंच्या संघाला खूप मदत होत असते. तेव्हा केवळ फलंदाजी किंवा गोलंदाजी दरम्यानच नव्हे तर क्षेत्ररक्षणासाठी अशा खेळाडूंची खूप मदत होत असते. उच्च दर्जाच्या क्षेत्ररक्षण करण्यासाठी उच्च दर्जाची फिटनेस गरजेचे असते म्हणून अनेक चांगले फिटनेस असलेले खेळाडू यशस्वी क्षेत्ररक्षक म्हणून नावारूपास येत असतात. अशा खेळाडूंना आपली करियर करणे सोपे जाते. अनेक फलंदाज आपल्या फलंदाजी शैलीत झालेला तांत्रिक बदल यांच्या बाबतीत व कालावधीत लक्ष देऊन काम करू शकतात आणि ही योग्य वेळ असते जेव्हा आपण आपले तंत्र घट्ट करू शकतो असे क्रिकेट प्रशिक्षक संतोष पाठक यांनी सांगितले.