राज्यातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. मुले- मुली शिकण्यासाठी शाळेत गेली. काही रिक्षातून, काही बसमधून, काही कारमधून, काही आई किंवा बाबांच्या स्कुटरवर बसून, काही आईचे बोट धरून शाळेत, छान नवीन गणवेष घालून आनंदाने, उत्सुकतेने चिमुरडी लेकरे शाळेत गेली.
शाळेत का जायचे? अर्थात शिकायला, शिस्त, संस्कार, कला शिकायला, खेळ खेळायला, एकत्र बसून डबा खायला. नवीन शाळा, नवीन शिक्षक, नवीन मित्र, नवीन पुस्तके, नवीन वह्या, उघडल्यावर छान सुवास देणारी, छान नवीन व प्रसन्न वातावरण हा छानसा अनुभव.
शिक्षणाचं जीवनात महत्व काय आहे?
शिक्षणाचे महत्त्व अनमोल आहे. शिक्षणामुळे व्यक्ती अधिक ज्ञानी आणि सुसंस्कृत बनते.शिक्षणाने व्यक्तीला स्वतः बद्दल, समाजाबद्दल आणि जगाबद्दल अधिक माहिती मिळते. शिक्षणातून चांगली नोकरी मिळण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी आणि समाजाच्या विकासासाठी योगदान देण्यासाठी मदत होते.
शिक्षणामुळे व्यक्तीला विविध विषयांचे ज्ञान मिळते.यामुळे जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि नवीन गोष्टी शिकण्याची प्रेरणा मिळते. शिक्षणामुळे समाजाचा विकास होतो, आर्थिक स्थिती सुधारते, व्यक्तिमत्व विकास होतो, नवनवीन संधी मिळते. करियर मध्ये प्रगती होते, गरीबी, बेरोजगारीचे निर्मूलन होते. ज्या देशांत शिक्षणाचे प्रमाण अधिक असते, त्या देशाचा विकास अधिक वेगाने होतो. म्हणून प्रत्येकाने शिकले पाहिजे. शिक्षण घेण्यासाठी वयाची अट नाही. ज्येष्ठ व्यक्ती शिक्षण घेऊ शिकतात. पूर्वी न शिकलेले लोक म्हणायचे शिकून काय उपयोग. ते पुढे म्हणू लागले शिक्षणामुळे प्रगती झाली.
- अ. दा. फरांदे,
शिक्षण व व्यवसाय समुपदेशक.