
वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सत्कार सोहळा
मुंबई : वानखेडे स्टेडियमच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर आणि माजी फलंदाज विनोद कांबळी यांच्यासह काही मुंबई क्रिकेटपटूंचा सन्मान केला.
वानखेडे स्टेडियमच्या वर्धापनदिनाचा मुख्य कार्यक्रम १९ जानेवारी रोजी होणार आहे. रविवारी सन्मानित होणारे सुनील गावसकर हे पहिले मुंबई कर्णधार होते. गावसकर यांना एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी स्मृतिचिन्ह प्रदान केले.
कांबळी पृथ्वी शॉला भेटला
यावेळी माजी भारतीय फलंदाज विनोद कांबळी देखील उपस्थित होता. २१ डिसेंबर रोजी आरोग्याच्या गुंतागुंतीमुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. कांबळी अजूनही आजारातून बरा होत आहे. या दरम्यान कांबळीची भेट भारतीय फलंदाज पृथ्वी शॉ याच्याशी झाली.
या प्रसंगी सुनील गावसकर म्हणाले की, ‘भारतीय क्रिकेटला खूप काही देणाऱ्या या प्रतिष्ठित स्टेडियममध्ये असणे माझ्यासाठी खरोखरच एक मोठा सन्मान आहे आणि २०११ च्या क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन हे केकवरील फक्त एक आयसिंग होते. वानखेडे स्टेडियमच्या ५० व्या वर्षाच्या उत्सवाच्या सुरुवातीचा भाग असणे हा एक सन्मान आहे. एक सलामीवीर म्हणून मी सुरुवात चुकवू शकत नव्हतो म्हणून मी इथे आहे. मी एमसीएला शुभेच्छा देऊ इच्छितो आणि शालेय क्रिकेटपासून मला ही संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. मी जे काही आहे ते एमसीएमुळेच मला पुढे नेत आहे. मला इथे आणल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू इच्छितो.’
सन्मानित झाल्यानंतर विनोद कांबळीने प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवरील त्याच्या खेळण्याच्या दिवसांबद्दल सांगितले. कांबळी म्हणाला की, ‘मला आठवते की मी माझे पहिले द्विशतक इंग्लंडविरुद्ध येथे केले आणि नंतर माझ्या कारकिर्दीत अनेक शतके केली. जर कोणाला माझ्यासारखे किंवा सचिन तेंडुलकरसारखे भारतासाठी खेळायचे असेल तर मी सल्ला देईन की तुम्ही कठोर परिश्रम करत राहा आणि ते करणे कधीही थांबवू नका कारण सचिन आणि मी लहानपणापासून ते करत आलो आहोत.’
भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर कांबळीचे स्वागत करताना दिसला. एमसीएचे माजी अध्यक्ष विजय पाटील यांचाही सन्मान करण्यात आला. वानखेडे स्टेडियमच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त एमसीएच्या भव्य समारंभात सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि दिलीप वेंगसरकर सारखे इतर महान क्रिकेटपटू देखील सहभागी होतील. माजी कर्णधार रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव आणि डायना एडुलजी हे देखील उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.